औरंगाबाद : जायकवाडी धरणातून औरंगाबाद महानगर पालिकेला पाणी पुरवठा करणारी 700 एमएमची जलवाहिनी अचानक फुटली आहे. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.


या वर्षात दुस-यांदा जलवाहीनी फुटल्याची ही घटना घडली आहे. यामुळे औरंगाबाद शहराचे पाणी पुरवठा वेळापत्रक कोलमोडले आहे. जलवाहिनी दुरस्तीसाठी पाणी बंद करण्यात आलं आहे.