लातूर : जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधव यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणातील फिर्यादी एक शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्याचे सोयाबीन शेतातुन अज्ञात व्यक्तीने चोरले होते. ज्याची तक्रार दाखल करून घेण्यासाठी तसेच शेती वादाचे प्रकरण मिटविण्यासाठी किल्लारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधव यांनी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 


ज्यांपैकी ५० हजाराची लाच किल्लारी पोलीस ठाण्याच्या समोर सरकारी रुग्णालयाशेजारी  स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.


दरम्यान लाचखोर पोलीस नाईक रमाकांत जाधव यांच्या विरोधात किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.