कोल्हापूर : महानगरपालिकेत आज महानगर पालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये  वादावादी , पाण्याच्या प्रश्नावरुन महानगरपालीकेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या केबीनलाच कुलुप ठोकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर महानगरपालीकेत आज पाण्याच्या प्रश्नावरुन महानगरपालीकेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या केबीनलाच कुलुप ठोकले. हे नगरसेवक इतक्यावर न थांबता थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे महानगरपालिकेत काही काळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
 
कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि पाणी गळतीचा प्रश्न दिंवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. पण महानगरपालीकेचे अधिकारी या प्रश्नाकडं गांभीर्यानं पाहायाला तयार नाही. त्यामुळं आज संतापलेल्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या ऑफीसलाच टाळ ठोकले. 


त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर हे  पोलिसांना घेऊन कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे उपस्थित असणारे नगरसेवक पोलिसांना घेऊन का आलात असा जाब विचारत  त्यांना धारेवर धरलं. यावेळी आयुक्तांबरोबर सुरक्षा देण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळं महानगरपालीकेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता.