रायगड :  रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्याविषयी रायगडकरांच्या प्रतिक्रिया संतापजनक आहेत, पालकमंत्री प्रकाश मेहता आठ-आठ महिने जिल्ह्यात येत नसल्याचा काही स्थानिकांनी आरोप केला आहे. तसेच त्यांच्या नको तेथे सेल्फी प्रेमावरही रायगडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ मे महाराष्ट्र दिनाला झेंडा वंदनासाठी पालकमंत्री प्रकाश मेहता हे ऐनवेळी आले नाहीत, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना झेंडा वंदन करावं लागलं अशी प्रतिक्रिया देखील स्थानिक लोकांनी दिली आहे. एकंदरीत लोकांच्या बोलण्यात प्रकाश मेहता हे जिल्ह्याच्या पालकत्वाविषयी गंभीर नाहीत.


सेल्फीचा मोह त्यांना आवडला नाही, याचा आम्ही निषेध करतो, ही संवेदनशीलता योग्य नसल्याचं काही स्थानिक नागरीकांनी म्हटलंय.