मुंबई: गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मनसेची सभा असतानाही शिवसेनेनं शिवाजी पार्कवर झेंडे लावले, सत्ता असूनही आम्हाला घाबरतात, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच शिवसेनेचे हे झेंडे म्हणजे बाळासाहेबांनी मला दिलेला आशिर्वाद आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 


सत्तेत असूनही शिवसेना विरोधकासारखी वागतेय, भाजप किंमत देत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, पण अंडी उबवायची आहेत आणि कोंबड्या पण खायच्या आहेत, असा टोला राज ठाकरेंनी शिवसेनेला लगावला आहे.