ठाणे : काहीच दिवसांत ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन बोलेन असं राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोलाही लगावला.  मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनासाठी राज ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते.


युती तुटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागणार आहे. यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार यावर सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. राज्यात आता पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका मांडता यावर लक्ष लागून आहे.