सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घराणेशाही आणल्याच्या राजू शेट्टींच्या आरोपाला कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी चोख उत्तर दिले आहे. मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही असं खोतांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, चळवळीत मशागत झाली असेल, तर नवी पेरणी करू नकोस असं मुलाला सांगू शकत नाही, असं खोतांनी म्हटले आहे. सत्ता आणि संघटना यापैकी काय निवडायचं हा सध्याचा प्रश्नच नसल्याचं खोतांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले.


शिवाय सध्या राज्यातल्या सरकारच्या कामकाजाबद्दलही खोतांनी समाधान व्यक्त केले आहे. भाजपचे कार्यकर्ते स्वाभामिनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना फूस लावतात या आरोपाचंही खोतांनी खंडण केले आहे.