सातारा : उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या साता-याच्या जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी गलांडे यांच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गलांडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चंद्रकांत गलंडे अमर रहेच्या घोषणांनी यावेळी सारा परिसर दुमदुमून गेला होता. अंत्यसंस्कारासाठी सरकारच्या वतीने विजय शिवतारे, महादेव जानकर आणि गिरीष बापट उपस्थित होते.