नागपूर : यूपीए सरकारच्या काळात 4 वेळेस सर्जिकल ऑपरेशन करण्यात आलं होतं, असं माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीए सरकारच्या काळात 4 वेळेस सर्जिकल ऑपरेशन करण्यात आलं, मात्र यूपीए सरकारने त्याचा फारसा गवगवा केला नाही, पण यावेळी जसं काही भाजपने जाऊनच ऑपरेशन पार पाडलंय, असं दाखवण्यात येतंय, असं शरद पवारांनी नागपुरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना सांगितलं.


भारतीय लष्कराच्या विरोधात आमची भूमिका कधीच नव्हती, सर्जिकल ऑपरेशनला आमचं पूर्ण सहमत आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं, एवढंच नाही तर पाकिस्तानला अजून जोरदार प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलं.