कोपर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये कोपर्डीत जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानं गुन्हेगारी वाढत असल्याचं मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा घटनांमधल्या आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोवर गुन्हेगारांना जरब बसणार नसल्याचं पवार म्हणाले. त्याचवेळी लोकांनीही अशा घटनांनंतर संयम दाखवायला हवा, कायद्याचा गैरवापर करु नये असं आवाहनही त्यांनी केलं.