अहमदनगर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आता पर्यंत नोटबंदीचे स्वागत केले होते. पण आता त्यांनी या नोट बंदीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर मध्ये  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पवार यांनी भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले. 


नोटबंदी नंतर सोनं, बेनामी मालमत्ता प्रकरण हाती घेणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलय. मात्र पत्नी आणि माऊलीच्या गळ्यातील सोनं मोजायची वेळ आली तर पुन्हा १५ - २० वर्ष सत्ता बघायला मिळणार नाही अशी भीती भाजपा खासदारांनी व्यक्त केल्याचं सांगत पवार यांची भाजप सरकारला कोपरखळी मारली.