बारामती : एकीकडे युतीतील शिवसेना भाजप एकामेंकाविरुद्ध आग ओकत असताना , जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉंग्रेस या पक्षांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बारामतीत बैठक पार पडली.. भाजपनं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठींबा घेणं मान्य नसून तसं झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी भूमिका घेईल असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे. 


लोकसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले, त्या राष्ट्रवादीचा भाजपनं पाठींबा घेणं कदापि मान्य नसून तसे झाल्यास योग्यवेळी योग्य भूमिका घेवू असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.