लातूर : केंद्र-राज्य सरकारमध्ये घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने रिलायन्स मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मुकेश अंबानी यांच्या बहुचर्चित रिलायन्स जिओ या नवीन सेवेवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे रिलायन्सच्या जियोमध्ये सर्रास वापरणेही चुकीचे असल्याची टीका शिवसेना खासदार तथा नेते अरविंद सावंत यांनी केली आहे. ते लातूरमध्ये आल्यानंतर बोलत होते. 


रिलायन्स आणि केंद्र सरकारच्या जवळीकतेवरही शिवसेनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले असून अशीच सुविधा पंतप्रधान सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या भारत संचार निगम मध्ये का करत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.