चंद्रपूर :  सिंदेवाही तालुक्यात गेल्या २५  दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघाला पिंजरांबंद करण्याचे प्रयत्न गेल्या चार पाच दिवसांपासून वनविभाग करतंय. पण या प्रयत्नांना यश येत नाही. दुसरीकडे वाघाचा शिवनी परिसरात धुमाकुळ सुरूच आहे. 


आजवर या वाघांनं ३ महिलांनाही ठार केलं आहे. वाघाची परिसरात वाढलेली दहशत आणि ग्रामस्थांमधला संताप पाहता वाघ जेरबंद होत नसल्याने, त्याला ठार करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.