मुंबई :  अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे, अशा माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला कल्याण-अंबरनाथ दरम्यान जास्त बसेस चालवण्याची विनंती केली आहे. ऐन सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने कल्याणपासून पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.  


कुर्ला-अंबरनाथ लोकलने कल्याण स्थानक सोडल्यानंतर ट्रॅक बदलत असताना लोकलचे डबे रुळावरुन घसरले. डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघातात ट्रॅकचे, वीजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. ऐन सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने कल्याणपासून पुढे प्रवास करणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.  


मध्य रेल्वेची सीएसटी ते कल्याण आणि पुढे कसा-यापर्यंत वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे.