सांगोला : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना राज्य मंत्र्यांनी घरचा अहेर दिलाय. शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीर राहू नका, त्यांचे मानसिक खच्चीकरण करु नका, असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दानवे यांना दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसना, काँग्रेस, मनसेने जोरदार आंदोलन सुरु केले आहे. अनेक ठिकाणी दानवे यांचा निषेध करण्यात येत आहे. 


दरम्यान, त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांकडून घरचा आहेर मिळाला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दानवे यांच्यासह सरकारमधी मंत्र्यांनी शेतक-यांप्रती कृतज्ञतापूर्व वक्तव्य करण्यात यावे, असा सल्ला दिलाय. त्याचबरोबर शेतक-यांप्रती संवेदनशील राहून त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ देवू नका असही त्यांनी म्हटलंय.