वर्धा : भाजप मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही संपायचं नाव घेत नाहीये. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत तुम्ही पूर्ण बहुमत द्या. वर्ध्याच्या विकासासाठी शंभर कोटी देतो. भाजपाचा नगराध्यक्ष बनला नाही तर केंद्र आणि राज्याकडून एक पैसाही मिळणार नाही असा इशारा राज्यचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिला आहे. मुनगंटीवारांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.