कोल्हापूर : जिल्हा बँकेला पतपुरवठा करा अन्यथा सोमवारी कोल्हापुरातल्या राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा काढला जाईल, असा इशारा  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ, यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभासदांची काल बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरात एसबीआय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि रत्नाकर बँकेवर मोर्चा काढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी या वेळी सांगितले.


ग्रामीण भागातला सहकार मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु असल्याचा आरोप यावेळी मुश्रीफ यांनी केलाय. जिल्हा बँकां बंद पडल्या तर शेतकऱ्यांना  कर्ज कोण देणार? खासगी बँका ग्रामीण भागात आहेत का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी सरकारला केला आहे.