नाशिक : जिल्ह्यात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही तीनही मुलं मालेगावच्या संगमेश्वर भागात राहणारी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गिरणानदीवरील रोकडोबा बंधाऱ्यात बुडून या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही जण पोहोण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.


पियुश हिरे, प्रशांत हिरे, निखील हिरे या ३ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मालेगावमधील संगमेश्वरच्या पाटील वाड्यातील ही मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे.