पंढरपूर : पालखीच्या दिशेने परतत असलेल्या वाऱकऱ्यांच्या ट्रकला जेऊर-करमाळा रस्त्यावर अपघात झालाय. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू तर इतर ४८ जण जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सर्व वारकरी त्र्यंबकेश्वरहून वारीत सहभागी झाले होते. निवृत्तीनाथांच्या पालखीतील हे वारकरी होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते पालखीकडे परतत होते. यावेळी ट्रकचालकाला झोप लागली आणि अपघात झाला. 


यात मोतीराम शिंदे या वारकऱ्याचा मृत्यू झाला. जखमी वारकऱ्यांवर नगर आणि करमाळामधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.