कल्याण : उंदराच्या औषधामुळे एकाच कुटुंबातील दोनजणांचा करुण अंत झाला. तर महिलेची प्रकृती चिंताजणक आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करुणा चाळीतील मुसळे यांनी घरामध्ये उंदीर मारण्यासाठी औषध फवारले होते. त्यातच त्या तिघांनी जेवण केले. मात्र जेवणानंतर तिघांची प्रकृती बिघडली.  त्यांना उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान यातील गेणू मुसळे आणि त्यांचा मुलगा अमोल मुसळे यांचा मृत्यू झाला तर गेणू यांच्या पत्नी अंजना यांची प्रकृती चिंताजनक आहे. 


याबाबत पोलीस अधिक तपास करत असून मात्र, पोलिसांना संशयास्पद अशी कोणतीही गोष्ट आढळून आलेली नाही.