कल्याण : दुर्गाडी पूल परिसरात काल रात्रीच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. मोटरसायकल चालवत असताना फक्त धक्का लागला आणि यावरून दोन तरूणांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसन हत्येत झालं. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तपास करीत संबंधित आरोपीला अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 वर्षीय संदीप हिरे हा पेपर टाकण्याचं काम करणारा युवक काल रात्री अहिल्याबाई चौकातून जात असताना त्याच वेळी तेथून जात असलेल्या अमोल जाधवला त्याच्या गाडीचा धक्का लागला. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला.


आरोपी अमोलने संदीपला त्याच्या गाडीच झालेलं नुकसान भरून देतो अस सांगतील खरं. मात्र, दुर्गाडी पुलाजवळ येताच अमोलने अचानक संदीपवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीपला रुग्णालयात नेलं असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.