सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे. जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकून त्यांच्याकडून सगळी रक्कम वसूल करा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी कोणताही पक्ष मानत नाही, जनता हाच माझा पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया उदयन राजेंनी दिली आहे. तसंच भ्रष्ट मंत्र्यांना गाड्या अडवून जाब विचारला पाहिजे, त्यांचे फिरणं मुश्किल केले पाहिजे, असं उदयन राजे म्हणाले आहेत. 


याशिवाय भारतमाता की जय म्हणायला लाज कसली वाटते असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केलाय..