ठाणे :  कुठेही कोणाचेही वारे हवा असली तरी ठाणेकर नेहमी भगव्याच्या मागे असतात, त्यामुळे ठाणेकरांना वंदन करायला आणि नतमस्तक व्हायला आलो असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले आहे. 


उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- महापौर उपमहापौरांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात आले. 
आज ठाणेकरांना वंदन करायला नतमस्तक होण्यासाठी ठाण्यात आलो 


- प्रत्येकवेळी ठाणेकर सेनेच्या मागे उभे राहिले आहेत.                         


- कोणाचीही वारे हवा असला तरी ठाणेकर भगव्याच्या मागे                        


- आयुक्तांचे आभार


- आम्ही जी वचने दिली आहेत ती पूर्ण करणार ठाणेकरांना वचन देतो आम्ही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही                        


- विजयाबद्दल शिवसैनिकांना मानाचा मुजरा हा विजय कार्यकर्त्यांनाचा विरोधी पक्षाला देखील धन्यवाद जनतेचा कौल ओळखून बिनविरोध निवडणून दिल्याबद्दल धन्यवाद


- ठाण्यातील भाजपाला सत्तेत सहभाग देणार का या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलणे टाळले, आयुक्त संजीव जयस्वाल याचा सत्कार उद्धव ठाकरे यांनी केला.