औरंगाबाद : समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्तांसोबत शिवसेना असल्याचं आश्वासन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलंय. औरंगाबादमध्ये समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या शेतक-यांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धीसाठी जमीन द्यायची की नाही ते एकदा शेतक-यांनी ठरवावं. त्यानंतर शिवसेना शेतक-यांना अखेरपर्यंत मदत करेल असं आश्वासन, उद्धव ठाकरेंनी प्रकल्पग्रस्तांना दिलंय. 


पक्ष सघंटनेच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत. इथे ते पक्ष पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. 


शनिवारी मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यांत शिवसेना पदाधिका-यांनी दौरा करुन काही ठिकाणी शेतक-यांसशी संवादही साधला. या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे घेणार आहेत.