उल्हासनगर : व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्याने दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडलेल्या या प्रकारात ४९ वर्षीय वडापाव विक्रेते चंदरलाल रामरखियानी १०० टक्के भाजले असून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामरखियानी यांचा उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात वडापावचा व्यवसाय आहे. महालक्ष्मी जंबो वडापाव या नावाचं दुकान ते चालवतात. मात्र सोमवारपासून त्यांच्या दुकानाच्या बाहेर सुरेश नामक एक फेरीवाला वडापावचा व्यवसाय सुरू करणार होता. यावरून चंदर आणि सुरेश यांच्यात वाद होता.


या वादातून संतापलेल्या सुरेशने सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमाराला रामरखियानी यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं. यावेळी त्यांनी बाहेर धाव घेतल्यावर आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर रामरखियानी 100 टक्के भाजले होते. रामरखियानी यांना जिवंत जाळणारा सुरेश हा फेरीवाला सध्या फरार आहे. त्याचा कसून शोध घेतला जातोय.