नाशिक : एकीकडे लातूर दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतही या दुष्काळाचं भयाण वास्तव समोर येतंय. पाण्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या सुरगणा भागात ही धक्कादायक घटना घडलीय. पाणी भरण्याच्या वेळी झालेल्या वादातून मंजुलाबाई वाघमारे यांचा मृत्यू झालाय. 


एका महिलेला धक्का लागला म्हणून ६२ वर्षीय मंजुलाबाई यांना उपस्थितांकडून मारहाण मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या मंजुलाबाईंना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


दरम्यान, याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.