मुकूल कुलकर्णी (नाशिक): नाशिककरांनो यापुढे तुम्हाला हॉटेलमध्ये ग्लास भरून पाणी मिळणार नाही. अर्धा ग्लास पाणीच तुम्हाला मिळेल. त्यासाठी हॉटेल प्रशासनाशी वाद घालू नका, कारण ते तुमच्याच चांगल्यासाठी असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लास अर्धा भरलेला आहे की रिकामा हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. मात्र आता तुम्ही नाशिकमधल्या हॉटेलात गेलात तर तुमचा ग्लास अर्धाच भरलेला असेल. 


नाशिककरांच्या घरापर्यंत दुष्काळाच्या झळा आल्या आहेत. गंगापूर धरणाने तळ गाठलाय. त्यामुळे भविष्यातलं पाणीसंकट लक्षात घेता हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी देण्याचा निर्णय घेतलाय.