जळगाव :  मुलीला  फोन  का  केला  म्हणून  मुलीच्या  कुटुंबांने  बेदम मारहाण केल्यावर एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष रसाळ असं मृत तरुणाचं नाव आहे. या तरुणाने जळगाव सुपेमधल्या एका मुलीला फोन केला. आपल्या मुलीला फोन केला म्हणून त्यामुलीच्या कुटुंबियांनी संतोषला तब्बल अडीच तास बेदम मारहाण केली. 


या मारहाणीनंतर संतोषने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानं देऊळगाव रसाळ या गावी आत्महत्या केलीय. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.