नांदेड :  याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेतून बाहेर जाण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर सरकारला पाच वर्ष कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. 


आता भाजप प्रदेशाध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांच्या सूरात सूर मिसळलाय. नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ दानवेंनी फोडला. यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.