ठाणे: ठाण्यात घडलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हसनेनं याआधीही 2 वर्षांपूर्वी कुटुंबियांवर विषप्रयोग केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबातल्या सहा जणांना त्यानं विष दिलं होतं. पण त्यावेळी उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पण यावेळी मात्र त्याचे मनसुबे सफल झाले. 


ठाण्यामधलं हे भीषण हत्याकांड प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हसनेनच्या नातेवाईकांनी ही माहिती पोलिसांना दिली आहे. तसंच प्रॉपर्टीसाठी कुटुंबामध्ये 3 गट तयार झाल्याचंही आता पुढे आलं आहे. हसनेनला प्रॉपर्टीमधून 21 कोटी रुपये मिळणार असल्याची माहितीही आता पुढे येत आहे. 


ठाण्यातील कासार वडवली येथे 14 जणांची हत्या करुन आरोपीनं आत्महत्या केली. हसनेन अन्वर वरेकर असं या आरोपीचं नाव असून तो पेशानं सीए असल्याचं कळतंय.


पहाटे 3च्या सुमारास हे हत्याकांड घडलं यात हुसेनची स्वताची दोन मुलं, आई, वडील, पत्नी, बहिणी आणि त्यांची दोन मुलं यांची हत्या केलीये.


रात्री हुसनेनं त्याच्या तीनही बहिणींना घरी जेवायला बोलावलं होतं. त्यानंतर त्यानं धारधार सु-यानं त्यानं या सर्वांची हत्या केली आणि स्वत:ला गळफास लावून घेतला. गळफास लावलेल्या अवस्थेमध्येच पोलिसांना त्याचा हातात सुरा सापडला आहे.


दरम्यान हसनेनचा मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे.