मुंबई : मुंबईतल्या सखल भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठतं. त्याचा सर्वसामान्य रहिवासी आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यंदा असे प्रकार घडू नयेत, यासाठी शिवसेनेनं हातपाय हलवायला सुरुवात केल्याचं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मंगळवारी मध्यरात्री खड्डे आणि डागडुजीच्या कामांचा पाहणी दौरा केला. त्यांच्यासोबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर होते. 


बीएमसीचे अधिकारीदेखील या पाहणी दौ-यात सहभागी झाले होते. वांद्र्यापासून घाटकोपरपर्यंत ही पाहणी करण्यात आली.