मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव आता तुडूंब भरले आहेत.  पावसानं मुंबईकरांवर चांगलीच कृपा केली आहे.यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वर्षभरासाठी दूर झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांची वर्षभराची तहान १४ दशलक्ष लीटर पाण्याने भागते. सध्याच्या परिस्थितीनुसार मुंबईच्या तलावांमध्ये १० दशलक्ष लीटर पाण्याचा साठा झाला आहे. येत्या काही दिवसात आणखी पाण्याचासाठा वाढण्याची अपेक्षा आहे. 


विहार आणि तुळशी हे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत,  इतर तलावक्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली आहे.