मुंबई : कट्टर शिवसैनिक असलेल्या अरविंद भोसले यांनी पुन्हा एकदा त्यांच्या चपलांचा त्याग केला आहे. महापालिका निवडणुकींचे निकाल लागत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार भोसलेंनी केला आहे.


याआधी 9 वर्ष अरविंद भोसलेंनी चपलांचा त्याग केला होता. कोकणामध्ये नारायण राणेंचा पराभव होत नाही तोपर्यंत पायात चपला घालणार नाही, असा निश्चय भोसलेंनी केला होता. राणेंचा पराभव झाल्यानंतर भोसलेंनी पायात चपला घातल्या होत्या.