मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्राबाबत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी एका पत्रकाद्वारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. 


या व्यंगचित्रामुळं मराठा समाजाच्या व मोर्चेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसचं या व्यंगचित्राच्या माध्यमातून मानवतेचा अनादर केला आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. या मागचा बोलविता धनी कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.