मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. याआधी 2 सप्टेंबरला बिहारी नागरिकांसाठी चोखा बाटी कार्यक्रमांचं आयोजन भाजपनं केलं होतं. आता मुंबईत मोठ्या प्रमाणात छटपूजा साजरी करण्याचं भाजपनं ठरवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः छटपूजेत सहभागी होणार आहेत. कुलाबा, दादर शिवाजी पार्क, पवई, चेंबूर, संजय गांधी नॅशनल पार्क, जुहू चौपाटी, वर्सोवा, मालाड, आक्सा- मारवे, भांडुप, मुलुंड,कुर्ला,पोयसर अशा 12 समुद्रकिना-यांच्या ठिकाणी भाजपनं छटपूजा आयोजित करायचं ठरवलं आहे. बिहारी तसंच उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून भाजपनं ही खेळी आखल्याचं बोललं जात आहे.