मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक जोरदार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. ठाण्याजवळील पारसिक बोगद्याजवळ माती ट्रॅकवर आल्याने आणि कळव्याजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.


सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरगार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी देखील साचलं आहे. ठाण्यातील विटावा भागात घरांमध्ये पाणी साचलं आहे. ठाणे, मुलुंड, बोरीवली, मालाडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.