मुंबई : राज्याचं विधीमंडळाचं अधिवेशन संपत असताना सरकारमधले दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रकांत पाटील यांनी स्नेहभोजन बोलावलंय. पण या स्नेहभोजनाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांना आमंत्रण नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेनं विरोधकांना साथ दिल्याने नामुष्की आली होती. सरकारला अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी १९ आमदारांचं निलंबन रद्द करावं लागलं होतं. आता अधिवेशन संपताना भाजपतर्फे चंद्रकांत पाटील यांनी स्नेहभोजन आयोजित करत शिवसेनेला संकेत दिल्याची चर्चा आहे.