मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हल्ला प्रकरणात नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक यांनीच बाहेरून गुंड  आणून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या हल्ल्यासंदर्भात त्यांनी घाटकोपरमधील पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे.  तसेच शरद पवार असेपर्यंत आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहू, अशी प्रतिक्रिया संजय पाटील यांनी दिली आहे.  


नवाब मलिक यांच्या चेंबूरच्या सभेत ७-८ अज्ञात बंदुकधारी घुसून गोळीबार केल्याची  घटना घडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तलवार हल्ला झाल्याचे पुढे आलेय. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून या हल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दिना पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.