मुंबई :  सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे.  जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 
 
 गोरेगाव येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केली.  त्यानंतर सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेकडे होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 त्यांनी माध्यमांशी न बोलता ट्विटरवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.