COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  भावकीनं वाळीत टाकलं म्हणून आंदोलन करत वर्षा बंगल्याबाहेर बसलेल्या हेवळकर जोडप्याला मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यात बोलावून घेतलं.  गणपतीच्या पूजेत आणि आरतीत त्यांना सहभागी करुन घेतलं.


तसंच या दाम्पत्याला वाळीत टाकलेल्या प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.


 कु़डाळमधल्या हेवळकर जोडप्याला भावकीनं वाळीत टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी दाद मागण्यासाठी हे दोघेही जण वर्षा बंगल्याबाहेर काल दुपारपासून बसले होते. 


अखेर आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना  वर्षावर बोलावून घेतलं.