मुंबई : 'ऐ दिल है मुश्कील सिनेमाच्या रिलीजप्रकरणी मुख्यमंत्री आणि मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यामध्ये असमर्थ ठरलेले मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात तोडपाणी झालंय, तसंच राजकीय गुंडगिरीसमोर मु्ख्यमंत्री झुकल्याचा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. 


खरंच पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालायची असेल तर तो निर्णय केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा... राज्यात याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचाय... पण, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अशा पद्धतीनं तोडपाणी करावं हे दुर्दैवी आहे. यातून राजकीय गुंडगिरीसमोर महाराष्ट्र शासन झुकलंय आणि त्यांनी नागरिकांनाही झुकायला लावलंय, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.