मुंबई : इलेक्ट्रॉनिक मदान यंत्रं तयार करतानाच ईसीआय ही कंपनी सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेते. त्यामुळं या यंत्रात कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची  मंगळवारी आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं. 


आगामी भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.