मुंबई : राज्यातल्या सर्व शाळांमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्याकडे तसा प्रस्ताव शिक्षण खात्यानं पाठवलाय. माहितीच्या अधिकारात ही माहिची सामान्य प्रशासन विभागानं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर राज्यातल्या जिल्हा परिषदेसह सर्व शाळांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू होणार. त्यामुळं मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. 


पाच दिवसांच्या आठवड्याची सक्ती करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्याआधारावर हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.