मुंबई : सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर अनारक्षित घटकांना 25 टक्के आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी झी 24 तासच्या रोखठोख या विशेष कार्यक्रमात केली.


हे प्रमाण 75 टक्क्यांवर जाईल त्यामुळं घटनादुरूस्ती करावी लागेल आणि याचा प्रस्ताव पंतप्रधानांकडे देणार असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत नमूद केलं. आरक्षणाबाबत आरएसएसचे मनमोहन वैद्य यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आपण सहमत नसल्याचंही आठवले म्हणाले.