मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्टेशन्सपासून थेट सीएसटीपर्यंत विनाथांबा लोकल सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी एकामागोमाग अर्ध्या तासाच्या अंतरानं अशा आठ गाड्या सोडण्याच्या संदर्भात मध्य रेल्वे चाचणी करतंय. 


एकदा कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याला चढलं की थेट सीएसटीला उतरता येणार आहे. या प्रवासात मधे दादरला थांबा द्यायचा का, याचाही विचार केला जातोय.