मुंबई : एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर पलटवार करायला सुरुवात केलीय. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचं नंबर वन पक्ष असल्याचा टोला खासदार भाजप खासदार किरीट सोमैय्यांनी शिवसेनेला लगावलाय.


विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला मुंबईतल्या 50 टक्क्यांहून अधिक वॉर्डमध्ये बहुमत मिळालं होतं, शिवसेनेला याचं भान आहे का असा बोचरा सवालीही सोमय्यांनी उपस्थित केला आहे. सध्या काही लोकांना सत्ता म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याचे मशीन वाटते. त्यामुळे त्यांना महापौर पदाची लालसा असते, असंही ते म्हणाले.