मुंबई :  एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार-पलटवार करणं सुरुच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त वॉर्डात भाजपला बहुमत मिळालं होतं, याचं भान शिवसेनेला आहे का?, असा सवाल करत किरीट सोमय्यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं आहे.


 आमच्या मित्रपक्षानं ज्ञान आणि भान दोन्ही ठेवलं पाहीजे आसा टोला शिवसेनेला लगावला आहे. मुंबईला माफियामुक्त आणि खड्डेमुक्त करण्यासाठी आमचा लढा आहे त्यासाठी सोबत यावंच लागेल असंही ते म्हणाले आहेत.


किरीट सोमय्या यांनी ऐनवेळी असं वक्तव्य जागावाटपाबाबत शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी तर केलं नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.