मुंबई : म्हाडाच्या 972 घरांसाठी बुधवारी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली. यामध्ये अनेकांना घर न मिळाल्यानं निराश व्हावं लागलं आहे. पण म्हाडा आता 2017च्या एप्रिल-मेमध्ये तब्बल 3 हजार घरांची सोडत काढणार आहे. सर्वसामान्य आणि गिरणी कामगारांच्या घरांसाठी स्वतंत्ररित्या ही सोडत काढण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घरांसाठी मुंबईत 838 हेक्टर जमीन महसूल विभागाकडून घेण्यात येणार आहे. पोलिसांना घरं देण्याबाबत आणि बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत म्हाडा सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.