मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी मुंबईकरांनाच डिवचलं आहे. मुंबईकरांना खड्ड्यात, मलेरियाच्या प्रादुर्भावात आणि टँकरवरच अवलंबून राहायला आवडतं, असं या निकालाचं विश्लेषण करावं लागेल, असं ट्विट मिलिंद देवरांनी केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मिलिंद देवरांच्या या ट्विट त्यांच्यावरच उलटल्याचं चित्र आहे. त्यांच्या या ट्विटवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. मुंबईकर काँग्रेसपेक्षा खड्ड्यात राहाणं पसंत करतील अशी ट्विट करण्यात आली आहेत.